news today, रामगिरी महाराज सारख्या साधू - संतांनी आमचे सरकार तारले - मुख्यमंत्री फडणवीस



श्रीक्षेत्र शनिदेव सप्तकुषीत दहा ते बारा लाख भाविकांच्या उपस्थिती 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.


वैजापूर, ता.06 / प्रतिनिधी - संत शक्ती मैदानात उतरल्यामुळेच सर्वांचा सुपडासाफ झाला.व्होट जिहादचं आक्रमण हे हिंदू संस्कृतीवर आक्रमण आहे हे जेंव्हा आम्ही रामगिरी महाराज व सर्व महाराजांच्या लक्षात आणून दिलं तेंव्हा संत महंतांनी हे आक्रमण परतवून लावले.अध्यात्म समाजाला प्रेरणा देते म्हणून मी सप्ताहाला पुन्हा येईन.संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे की मी पुन्हा येत असतो. सदगुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह पाहून मला त्या अथांग महासागराप्रमाणे येथील भाविकांचा महासागर पाहून मी भारावून गेलो. संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे की मी पुन्हा पुन्हा येत असतो.मी महाराजा नाही पण सांगतो की मी पुन्हा पुन्हा या सप्ताहाला येणार कारण मूठभर लोकांनी व्होट जिहाद पुकारला होता परंतु रामगिरी महाराज सारख्या साधू संतांनी आमचे सरकार तारले आहे. त्यांच्या आशीर्वादाने या सरकारचे काम चालू आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्ताह सांगता सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.


शनि देवगाव येथील उच्च पातळीच्या बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू होईल व श्री क्षेत्र सराला बेटाचा 109 कोटीचा विकास आराखडा असेल असे सांगून आमचे सरकार ते करण्यास सकारात्मक व कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

हरिनाम सप्ताहाचा माध्यमातून समाजाला दिशा मिळते - महंत रामगिरी महाराज 

सदगुरू गंगागिरी महाराज यांनी दोनशे वर्षीपुवी स्वातंत्र्यपूर्व काळात तरूण व्यसनाच्या आहारी जात होता म्हणून अशा तरुणांना सप्ताहाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवाहात आणले त्यानंतर मुघल शासन असताना सुध्दा ही परंपरा बंद पडू दिली नाही. मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,  मनोवृत्तीत बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात असून सप्ताह काळात वीस ते पंचवीस लाख लोकांनी अध्यात्म विज्ञान संस्कृती भजन कीर्तन कृषी प्रदर्शन यामधून अध्यात्म व विज्ञान याची सांगड घातली तरच समाजात परिवर्तन घडते असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी  केले.


श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज यांचा 1778 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनातून ह.भ.प. रामगिरी महाराज आपल्या अभंगात "कृष्णा वेध येली विरहिणी बोले" ह्या  संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगातील कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी स्त्री, गोपी चंद्राला पाहून म्हणते की, "हे चंद्रा, तू माझ्या अंगाला उबारा देत आहेस, पण मला चंदन लावू नकोस, वाराही घालू नकोस. कारण कृष्णाशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही." या अभंगात, विरहिणी स्त्री कृष्णाच्या विरहाने किती दुःखी आहे, तिची व्याकुळत आणि कृष्णाशिवाय तिला कशातच आनंद मिळत नाही हे विरहान रचनेतून महाराजांनी स्पष्ट केले.
रचनेचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले.  अध्यात्मात आल्यास भजन -किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही .शास्त्र हे नित्य नवीन असून अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातल्यास मानवी आरोग्यासाठी फार मोठी देणगी आहे.त्यामुळेच युवकानी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो  दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात दुःख रुपी विष पचवल्याशिवाय सुखाचे लोणी मिळत नाही योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून सन्मार्गावर आणले महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या घुगर्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले मनाची वृत्ती बदलण्याची ताकत फक्त हरिनाम सप्ताह आतच असल्याचे महाराज म्हणाले.. 

महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जलसंधारण मंत्री गिरीष महाजन,,ना. राधाकृष्णन विखे पाटील, आमदार रमेश पाटील बोरणारे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, डॉ.दिनेशभाऊ परदेशी,आविनाश पाटील गंलाडे डॉ प्रकाश शेळके सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योंगानंद महाराज, विक्रम महाराज, सराला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्यासह दहा ते बारा लाख भाविकांच्या उपस्थितीत या सप्ताह सोहळ्याची सांगता झाली.



Post a Comment

0 Comments