news today, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयात 2 लाख 60 हजार 419 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान

वैजापूर तालुक्यात 31 हजार 691  हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान 

छञपती संभाजीनगर, ता.27 - छञपती संभाजीनगर जिल्हयात  यंदा कपाशी पिकाची सरासरीच्या तुलनेत कमी  लागवड झाली त्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख 60 हजार 419 हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन कमी होणार हे स्पष्ट आहे. 

कृषी,महसूल व पंचायत विभागाच्या एकत्रित अहवालानुसार ,सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयात कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून काही भागात एक किंवा दोन वेचणीच होण्याची शक्यता आहे. कासाची वेचणी करणे शेतकरी व मजुरांना प्रचंड जड जात असून वेचलेला कापूस वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अजूनही काही भागात पावसाच्या हलक्या व मध्यम सरी कोसळत असल्याने हा पाऊस फुटलेल्या कापसाला ओला करून त्याचा दर्जा घसरविण्यास कारणीभूत ठरत असल्याची स्थिती आहे. 

Post a Comment

0 Comments