महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 रोजी निकाल लागणार आहे. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि शहर अशी सरमिसळ असल्याने तेथील निवडणूक अधिकारी उपलब्ध नाहीत. परिणामी 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेणे आयोगाला शक्य नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच आचारसंहितेसाठी पुरेसा वेळ देणेही आवश्यक असल्याने सहा किंवा सात फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,, छञपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, आणि लातूर या बारा जिल्हा परिषदांमध्ये आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा पाळण्यात आली आहे. याठिकाणी निवडणुकांबाबत कोणतीही अडचण नाही.
0 Comments