स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्य शासन व निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. पालिकेला दिलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या टप्प्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. दोन वार्डाचा एक प्रभाग अशी रचना तयार करून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोग किंवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप आराखड्यास मान्यता दिल्यानंतर तो प्रारूप आराखडा 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना मांडता येणार आहेत.
प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिध्द करण्यात येईल.
0 Comments