वैजापूर, ता.10 / प्रतिनिधी - जुलै महिन्यात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नाशिक जिल्हयातील विविध धरणांमध्ये 89.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड धरणात 69.53 टक्के पाणीसाठा असून या धरणातून 5 ऑगस्टला डाव्या कालव्याव्दारे नारंगी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. 100 क्युसेकने हे पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात येत असून आज या धरणात 5.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालखेड डाव्या कालव्यातून नारंगी धरणात पाण्याची आवक सुरू असून अत्यंत कमी प्रमाणात पाणी येत आहे.
वैजापूर तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प व बोर दहेगाव मध्यम प्रकल्प या तीन धरणात आज ता.10 ऑगस्ट 2025 रोजी उपलब्ध असलेला पाणीसाठा असा -
1) नारंगी - ( मध्यम प्रकल्प )
पाणीपातळी - 529.50
एकूण क्षमता - 2.465 Mm3
उपयुक्त क्षमता - 0.670 Mm3
टक्केवारी- 5.83 %
2) कोल्ही - (मध्यम प्रकल्प )
एकूण पाणीपातळी - 558.914M
एकूण क्षमता - 2.383 Mm3
उपयुक्त क्षमता - 1.985 Mm3
टक्केवारी - 61.24 %
3) बोरदहेगाव - (मध्यम प्रकल्प ) पाणीपातळी - dry
एकूण क्षमता - dry
उपयुक्त पाणीपातळी - dry
टक्केवारी - Nil
वैजापूर - गंगापूर तालुक्यासाठी नामका जलद कालव्याला आवर्तन
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत पाणी विसर्ग बंद मात्र, जलद कालवा सुरू आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीचे दोन्ही कालवे तसेच वैजापूर - गंगापूर भागात जाणारा जलद कालवा सुरू आहे. पाण्याची आवक वाढली तर गोदावरीत पुन्हा विसर्ग होऊ शकतो.अशी माहिती सूत्रांनी दिली.
0 Comments